Maharashtra drought: महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी पाऊस येण्यास विलंब झाला व राज्यामध्ये अनेक भागांमध्ये सध्या परिणामकारक पाऊस झालेला नसल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाचे अंदाज चुकत आहेत व 13 जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे काही जिल्ह्यांना रेड झोन लागला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
सध्या महाराष्ट्र मध्ये चांगल्या पावसाची गरज आहे. विविध ठिकाणी पिके तानावर आले आहेत व पिकांना पाण्याची गरज वाढली आहे. मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे व अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील अशी भीती आहे.
Maharashtra drought: राज्यात दुष्काळी परिस्थिती
मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे परिस्थिती भीषण होताना बघायला मिळत आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस चांगला झाला नाही त्यामुळे राज्यामधील 33 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याची पिण्याच्या पाण्याची अवघड स्थिती झाली आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, अहमदनगर, जालना, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, सातारा, अकोला, हिंगोली, आणि वाशिम, अमरावती या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस पडला आहे संबंधित जिल्ह्यांवरती दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या पुढील पाच दिवसांची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मधील मराठवाड्यामध्ये पावसाची स्थिती भयानक आहे. ठिकठिकाणी चांगला पाऊस पडलेला नाही त्यामुळे रेड झोन मध्ये 13 जिल्ह्यांपैकी सहा जिल्हे हे एकट्या मराठवाड्यातील आहेत. मराठवाड्यामधील धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर काही जिल्ह्यांना गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठ्याची स्थिती निर्माण झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान अंदाज आणि बातमीपत्रासाठी शेतकरी ग्रुप जॉईन करा
हे पण बघा:
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा